पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
आझम कँम्पस ग्रीन ऑडिटोरियम येथे हे काव्य संमेलन झाले. गझलकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी या संमेलनाचे उद्घाटन करून गझल सादर केल्या.
उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, ‘आझम कँम्पसच्या पुढाकाराने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. मराठी लेखनात काव्य हा लोकप्रिय काव्यप्रकार आहे. कविता लिहिणे हा आनंददायक प्रकार असतो. भावनांना शब्दांत आपण दाद देतो तेव्हा कविता जन्माला येते. मिर्झा गालीब यांची शायरी लिहिण्यावरील निष्ठेने समाजात लोकप्रिय झाली.’ मराठीतून स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँग्लो उर्दू बाईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य परवीन शेख यांनी केले. मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख यांनी संयोजन केले. या वेळी कविता भोसले उपस्थित होत्या. संमेलनात २००हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
परीक्षण नूतन शेटे, झुबेर पटेल यांनी केले. इम्रान झारेगीर यांनी आभार मानले.